कवडीचुंबक
5 व्या वर्गात आम्ही एक नाटक बसविले. साहित्याचा आणि नाटकाचा माझा तो पहिला परिचय. आचार्य प्र. के. अत्रे लिखित “कवडीचुंबक” नाटकातील एक उतारा आम्हाला बालभारती च्या पुस्तकात अभ्यासक्रमात समाविष्ट होता. ठरले की हेच नाटक बसवायचे. खर सांगतो , कुणाचे मार्गदर्शन नाही , कुणी लक्ष्य ठेवणारा नाही. तमाशा आणि टुरिंग टाकीज च्या पिक्चरचा अनुभव गाठीशी आणि तोही प्रेक्षक म्हणून पण आमच्या जवळ होती कल्पकता आणि साकारायचे वेड. तुम्हाला जमणार नाही असे म्हणणारा कोणी नव्हताच आजूबाजूला आणि असता तरी आम्ही एकणार्यानपैकी नव्हतो. गुरुजींनी पात्र ठरवून दिले , अनिल तू पम्पुशेठ , रतीलाल तू रामदासी आणि मोहन तू पंपुशेठचा सेवक केशर. आचार्य अत्रेंचे नाटक म्हणजे काही खाऊ नाही. लांबच्या लांब संवाद पण आम्ही एकमेकांचे सुद्धा पाठ करून टाकले. प्रोम्प्टर ची गरजच ठेवली नाही. एक अडकला की दूसरा त्याची गाडी सुरू करून देत असे. शाळेत आम्ही प्रॅक्टीस करत असू पण त्याचे काही फार कौतुक वाटले नाही. पाढे पाठ करायचो , कविता पाठ करायचो माराच्या धाकाने आता धडा पाठ करतो आहोत एव्हढेच. आठ दिवसपण लागले नसतील. बहुधा 26 जानेवारीचा मुहूर्त होता कारण