Posts

नदी

“नदी सागरा मिळता , बाहेर येईना पुन्हा ! अशी शहाण्यांची म्हण – नाही नदीला माहेर“ पण आमचा पत्ता मात्र आमच्या नदीचाच. तसा आमचा गाव हा सोन नदीच्या काठावरचा , हि वाघुर नदीची उपनदी आहे , अजिंठा लेणीत उगम पावणारी नदी ती हिच. नदी गावाला चंद्रभागेसारखाच वळसा घालते (चंद्रकोरी प्रमाणे) आणि पुराचे पाणी वाढले कि त्या चंद्राचा पूर्ण सूर्य होतो. गाव बनते मग एक बेट. लोकांना मग रात्रभर जागवेल अशी हि नदी आहे. आता तिच्यावर वरती २ धरणे झाल्यापासून तिचे इतके रौद्र रूप नव्या पिढीने कदाचित पाहिले नसेल पण सगळ्यांना घरादारा सहित वाहून न्यायची ताकद ठेवते ती. हल्ली तशी संथ वाहते पण खूप जास्त पाऊस झाला कि थोडासा पूर येतो. नोव्हेंबर पर्यंत धार वाळायला सुरु होते. तिच्यावर २-३ कोल्हापुरी टाईप बंधारे आहेत त्यांच्यात पाट्या टाकून पाणी अडवले जाते. त्यात मासेमार छोट्या मासोळ्या पकडतात. फेब्रुवारी मध्य पर्यंत अगदी कोरडी ठाक. कितीही चांगला पाऊस झाला तरी मार्च ते मे महिन्यात नदीत ढुंगण धुवायला सुद्धा पाणी नसते. तर आमची नदी पावसाळ्यातच खळखळ वाहते , तिच्या धारेत झेपायची (पोहायची) मजाच काही और आहे. कडकडीत श्राव...

ओळख

सगळ्यात प्रथम तुमची ओळख करून देतो आमच्या गावच्या नदीशी कारण ती आमची रक्तवाहिनी आहे , हा गाव आहे एक पुराण पुरुष त्याला समजून घेण्यासाठी तुम्हाला पहिले आम्हाला समजून घ्यावे लागेल. गाव बनतो त्यातील माणसांनी , त्याला आकार मिळतो तिथल्या चाली रितींनी , मग ओळख करून देतो आमच्या सरकारी विहीरीशी , शाळेशी , मित्रांशी त्यातील लोकांशी आणि खेळांशी.. तुम्ही म्हणाल हे तर आमच्याही गावाला आहे. बघा नीट विचार करून उत्तर द्या.. तो गाव आता फक्त मनात आहे आमचा आणि तुमचा काय , दोघांचाही गाव हरविला आहे आणि त्याला शोधून काढण्यासाठी पहिले तो कसा होता हे समजून घ्यायला नको ? पण मग तुम्हाला आमची भाषा शिकावी लागेल , शिव्या शिकाव्या लागतील. आमची Terminology आमचे खेळ आणि इतर उद्योग समजून घ्यावे लागतील. ही कथा १९८० ते १९९० च्या काळातील आहे , हा अनुभव मात्र आपल्या सगळ्यांचा सारखाच आहे. तुम्हाला कदाचित तुमचा हरविलेला सुखाचा धागा यात मिळेल. आपल्या गावात वेगवेगळे कथानक आहेत आणि वेगवेगळी पात्रे आहेत , आता काळाच्या ओघात ती सगळी वाहून गेलीत पण त्यांचे ठसे मानस पटलावर आजही आठवणींचा सुगंध बनून दरवळतात. ह्या सगळ्...

मनोगत

खूप दिवसापासून वाट पाहत होतो , पण मला पडलेल्या प्रश्नांचे उत्तर सापडत नव्हते ! स्वतःशी केलेला वाद , संवाद , पुस्तकांमध्ये धुंडाळले , थोरा मोठ्यांचे सल्ले घेऊन पहिले, तत्वज्ञानात शोधले   पण सगळीकडे भेटले मातीचेच पाय. आज अचानक वाट सापडली, उत्तर सापडले आणि म्हटले चला लिहून काढावे. परत हा विचार पण आला कि मी नाही सांगणार तर कोण सांगेल! कुणासाठी तर जगासाठी ! स्वतःचे नाव पण नाही , उगीच इगो ग्रॅटिफिकेशन नको (म्हणजे माझीच कशी लाल). काळजी घेतली आहे कि जिथे तिथे "मी/माझे/आमचे" डोकाऊ नये पण शेवटी मनच ते ! ओखारी करणारच , तर अशा ठिकाणी कृपया बाळबोध समजून माफ करावे हि विनंती. “ शेतकऱ्याचा पोरगा मी , दोन आयुष्य जगलो ! रानाचे आणि शहरांचे , मजुरीचे आणि कॉर्पोरेटचे , भारताचे आणि इंडियाचे. मराठीतच लिहीन हा अट्टाहास कारण मायबोलीची ताकद इंग्रजीला नाही. शब्द देव आहेत म्हणून त्यांनी उगी यावे आणि काळजाला भिडावे. मी ओझे वाहीन , परब्रह्म व्यक्त होतील आणि ते भेटतील थेट तुमच्या हृदयाला. काही चुकले तर माझे , काही वर्मी लागले तर ते पांडुरंगाचे.” आता नाही तर मग केंव्हा सांगेन ? म्हणून म्हटले लायन ...