Posts

Showing posts from May, 2020

एसटी

मला मी कधी एसटीबद्दल सांगेन असे झाले आहे. आम्ही गावात शिकत असतांना आयुष्य हे कसे निवांत होते , प्रत्येकाजवळ वेळच वेळ होता. वाहनांचे प्रकार म्हणजे गाडी बैल , एसटी आणि ट्रॅक्टर. ज्यांनी २५-३० किलोमीटर गाडी बैल ने प्रवास केला आहे त्यांना कुठल्याही वाहन प्रकाराचे महत्व हे वाटणारच. तर जेंव्हा एसटी सुद्धा नव्हती तेंवा तालुक्याच्या गावावरून जाणारी भुसावळ-मुंबई प्यासिंजर जी सकाळी ११ वाजता असायची तिला गाठण्यासाठी आम्ही गाडीबेल ने सकाळी ३ वाजता घरून निघायचो. गाडी बैल वरचे कडब्याचे कुशन , पितळीचा तांब्या , ट्रंक , धान्याचे बाचके , डाळी साळी , केळीचा घोडा , भुईमुगाच्या शेंगा. सगळे पुढे सरकून बसायचे कारण गाडी उरळ यायची ( मागे जर वजन जास्त झाले तर बैलांना फास लागायचा जोत्यांचा (बैलाला दुश्यार ला यानेच जुंपले जायचे). सडक म्हणजे माती आणि जाड्या भरड्या न दबलेल्या खडीचा पसरलेला समुदाय. रस्त्याला भविष्यातील कामासाठी टाकून ठेवलेले खडीचे ढिगारे वर्षानुवर्ष आपली कर्मकथा सांगत राहायचे. रस्ते हि जीवनावश्यक बाब तेंव्हाही नव्हती आणि आजही ती कुणाला वाटत नाही. तर अशा रस्त्यांवरून उद्ळत चालणारे वाहन , खूप लां...

नाना

आमचे नाना म्हणजे चार आयींचे एकुलते एक पोर , त्यांचे नाव मल्हारी असल्यामुळे त्यांना मित्र होळकर म्हणत. मोडी लिपीत लिहायचे आणि वाचू शकायचे. वजन ३५ किलो असेल फारतर वय ६० ते ६५ च्या घरात. नानाशी माझे भांडण आणि तह ह्या दोनच पातळीवर संवाद चालत असे. मी त्यांना नेहमी एकेरीच उल्लेख करीत असे.   गावात एक लायब्ररी होती , ज्याने पुस्तक नेले तो परत आणून द्यायचा नाही त्यामुळे ती बंद पडली. त्या लायब्ररीतून पुस्तक आणून वाचने हा आमचा दुवा होता. नानाचे पुस्तक मी चोरून वाचायचो त्यामुळे नानाची प्रायव्हसी डिस्टर्ब व्हायची. नानाची एक पेटी होती , त्या पेटीत सगळ्या गावाचे भूत , वर्तमान अन भविष्य बंदिस्त होते. त्या पेटीची किल्ली नेहमी त्याच्या कमरेच्या करधोडाला तो बांधून ठेवीत असे. त्याच्या २ कपाट होत्या आणि त्या सगळ्यांना दाबली कि लाक होणारी कुलुपे होती , सातवी पर्यंत मी त्यांना तारा ने उघडायला शिकून गेलो होतो. नाना राजकारणी, त्यांना खूप मान होता , सगळे त्यांना काका म्हणत. सगळ्यांची भांडणे निस्तरायला सगळ्यांना मात्र तो लागत असे. मरिओ पुझो च्या ग्वाड्फादर सारखा. त्याची इमानी माणसे होती त्यांना तो कामाल...

सरकारी विहीर

लोकहो १९८० मध्ये माझ्या गावात एक विहीर होती , ( म्हणजे मला आठवते तेंव्हापासून , माझा जन्म १९७२ सालाचा) सरकारी विहीर ! नदीकाठी आणि बाजूला मराठी शाळा.   त्या विहिरीवर सकाळी आणि संध्याकाळी सगळा गाव पाणी भरायचा , त्याला दोन बाजूने लोखंडी रहाट होते. मोठा कट्टा असल्यामुळे तिचा वापर दुपारून बसायला , गप्पा मारायला व्हायचा. बाजूलाच नदी ८-१० महिने वाहायची , परसाकडे जाणाऱ्या मित्रांची बसायची सोय म्हणजे हि विहीर (म्हणजे ज्याला लागलेली नाही तो इथे वाट पहायचा). इथून एकीकडे गाव दिसायचा आणि दुसरीकडे नदी , शाळा , शेताकडे जाणारा रस्ता. भैरोबाचा दगड आणि म्हसोबाचा दगड पण शेजारीच होते. नदीचा डोह आणि पोहणारी उनाड मुले नजरेच्या टप्प्यातच होती. उनाड मुलांना शाळेवर चीडीमारी साठी , अडल्या शेतकऱ्याला , शेतकामासाठी मजुर शोधायला   ही जागा उपयोगी पडे , तिथून एक रस्ता नदीकडे वळायचा. पाणी पिण्यासाठी आणलेली गुरे , म्हशी पाण्यात निवांत डुंबे पर्यंत ढोरके इथे बसून बिड्या फुकीत. मराठी मुलांची शाळा आणि तिचा गेट एका अंगाला आणि समोर चिले पाटीचा आखाडा (याबद्दल नंतर कधी तरी) ! तर त्या एका सरकारी विहिरीवर सगळ्य...